Jal Pradushan Prakalp (जल प्रदूषण प्रकल्प) Marathi
जल प्रदूषण ही एक महत्त्वपूर्ण पर्यावरणात्मक समस्या आहे. पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. पाण्याला रसायनांचा राजा असे म्हटले आहे. हे एक निसर्गातले आश्चर्यकारक रसायन असून हजारो पदार्थांना स्वतः मध्ये सामावून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला ‘ वैश्विक दावण ‘ ( Universal Solvent ) असे म्हटले आहे. पाणी म्हणजे संजीवनी. पाण्याला खूप उपमा दिल्या आहेत. एकवेळ मानव अन्नाशिवाय जगू शकतो पण पाण्यावाचून तो जगू शकत नाही
या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे परिसरातील वाढत्या जल प्रदूषण पातळी बाबत प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले. तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.
जल प्रदूषण प्रकल्प – जलप्रदूषण कारणे
१. नैसर्गिक कारणे
१) अतिपाऊस
२) सेंद्रीय पदार्थांचे विघटन
३) भूकंप
४) ज्वालामुखी
५) पूर
६) उल्कापात
७) वादळे वगैरे
अशी कारणे जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात .
मानवनिर्मित कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे . कारण निसर्गनिर्मित कारणापेक्षा मानवनिर्मित कारणे ही मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला जबाबदार असतात . ती कारणे व त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे .
२.मानवनिर्मित कारणे :
- १) मानवी वसाहतीतील दैनंदिन व्यवहार
- २) कारखानदारी / वाढते औद्योगिकरण
- ३) शेतीतील जंतूनाशके किटकनाशकांच्या अतिरिक्त फवारणी / हरितक्रांती.
- ४) रासायनिक खतांचा वापर
- ५) सागरी वाहतूक
- ६) प्लॅस्टिक व केरकचरा जलाशयात विसर्जन
जलप्रदूषण नैसर्गिक कारणे
- १ ) अतिप्रमाणातील पाऊस : पाऊस जर अतिप्रमाणात पडत असेल तर जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते . नद्या त्यांच्या मर्यादेच्या पातळीपेक्षा वर जाऊन जमिनीवरील धूळ , घाण , कचरा , टाकाऊ पदार्थ पाण्यात जाऊन पाणी प्रदूषित होते .
- २ ) सेंद्रिय पदार्थाचे विघटन : ” विघटन ‘ ही एक महत्त्वाची नैसर्गिक किचकट प्रक्रिया आहे . अनेक सजीवांचे मोठ्या प्रमाणात जमिनीवर , पाण्यात विघटन चालू असते . विघटन म्हणजे कुजण्याची प्रक्रिया यामुळेही मोठ्या प्रमाणात जीवाणू , विषाणूंची निर्मिती होऊन पावसामुळे हे पदार्थ जमिनीवरून पाण्यात मिसळतात व जलप्रदूषण घडून येते .
- ३ ) भूकंप : बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा जगभरात भूकंप घडत असतात . यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व इतरही हानी होतेच पण त्याच वेळी अनेक सजीवांच्या विघटनाची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात होते . पडझडही मोठ्या प्रमाणात झाल्याने जलप्रदूषणाला चालना मिळते . म्हणजे भूकंप हे ही नैसर्गिक कारण मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते .
- ४ ) ज्वालामुखी : ज्वालामुखी ही नैसर्गिक कारण मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते . विशिष्ट परिस्थितीत जमीनीतील ज्वालारस ज्यावेळी पृथ्वीच्या पोटातून मोठ्या प्रमाणात उसळून बाहेर येतो तेव्हा त्याला ज्वालामुखी असे म्हणतात . यामुळे ही पृथ्वीच्या पोटातील विविध विषारी रसायने पृथ्वीतलावर येतात व पृथ्वीवरील व आतील अशी अनेक विघातक घटक विविध प्रकारे पाण्यात मिसळून पाण्याचे प्रदूषण होते .
- ५ ) पूर : पुर ही नैसर्गिक परिस्थिती जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते . अतिपावसाचाच हा परिणाम .