Garud Puran Marathi PDF
गरुड पुराणाला पुराण साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे, सनातन धर्म म्हणजे मनुष्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठण केल्याने त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. या गरूण पुराणात एकूण २८९ अध्याय आणि १८ हजार श्लोक आहेत.गरुड पुराणात असे म्हटले आहे की जिथे जीवन आहे तिथे मृत्यू देखील निश्चित आहे, जो जन्म घेतो त्याला वेळ आल्यावर मरावे लागते आणि जो मरतो त्याला जन्म घ्यावा लागतो. हे पुराण जन्माचे तत्व सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे, जीवनाचे परिवर्तन हे संपत्ती मरणाने होते, हे ध्रुव सत्य सर्वांनी मान्य केले आहे आणि ते दृश्यही आहे, म्हणूनच उद्याच्या मृत्यूपासून रक्षण करताना औषध, तपश्चर्या, दान आणि आई- वडील आणि भाऊ, कोणीही अर्धा सक्षम नाही.
यावरून असे दिसून येते की, समाजात जी एक भ्रामक समजूत आहे की, हा ग्रंथ केवळ सुतक असतानाच वाचावा. इतर वेळी तो घरात ठेवूसुद्धा नये, ती फोल आहे. तिला कसलाही शास्त्राधार नाही. याशिवाय मरणानंतर अटळ असणाऱ्या प्रेतावस्थेला ओलांडून पुढे जाण्यासाठी मृतांच्या संबंधित व्यक्तींनी करावयाच्या विधि-विधानांचे स्पष्टीकरण आहे. ते विधी केल्याने त्यांच्या फळांचे साहाय्य मिळून मृताचा पुढचा प्रवास यातनामय न होता सुखकर होतो, असा सिद्धान्त यात मांडला आहे. त्यात अंत्यविधी, पिण्डान, सपिंडीकरण, श्राद्धविधी, वृषोत्सर्ग वगैरे विभाग आहेत. तिसरा भाग ब्रह्म काण्ड हा असून तो सर्वच भाषांतरित प्रतीत सापडत नाही; परंतु व्यंकटेश्वर प्रेसने छापलेल्या प्रतीत समाविष्ट आहे. त्या भागात श्रीहरिचे माहात्म्य, प्रलयानंतर त्याचे योगनिद्रेतून उत्थान, सृष्टीची उत्पत्ती, नारायण स्तवन, सृष्टीचा विस्तार, विष्णूचे आणि लक्ष्मीचे विविध अवतार, शेषाचे व रुद्राचे अवतार आणि श्रीकृष्णाच्या विवाहांच्या कथा समाविष्ट आहेत.
Garud Puran Marathi PDF (श्रीगरुड़ पुराण कथासार)
गरुडपुराणाची रचना तीन भागांत केलेली आहे. १. आचार काण्ड, २. धर्म काण्ड (प्रेतकल्प), ३. ब्रह्म काण्ड असे ते तीन भाग आहेत. पहिल्या आचार काण्डात सृष्टीची उत्पत्ती; ध्रुवचरित्र; ग्रहांच्या आणि देवतांच्या उपासना; भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि सदाचार ह्यांचे महत्त्व; योग प्रक्रिया; सप्तलोकांची रचना; वैद्यक शास्त्र, ज्योतिष, स्वरोदय शास्त्र, रत्न परीक्षा, वर्णाश्रम धर्म, नीतिशास्त्र, व्रत-वैकल्ये, स्तोत्रे अशा विविध विषयांचे मार्गदर्शन केलेले आहे.
दुसरा भाग धर्म काण्ड, अर्थात प्रेतकल्प हा आहे. त्यामध्ये, प्रत्येकाला अटळ असलेल्या मृत्यूनंतर त्या जिवाला कोणती गती मिळते, अशा सनातन प्रश्नांचे स्पष्टीकरण आहे. उत्क्रांतीच्या प्रवासात जन्म-मृत्यू- जन्म अशी साखळी असून त्यात व्यवस्थेविषयीची त्रोटक माहिती आहे. तिचा अभ्यास केला तर कर्माच्या परमेश्वरी कायद्याची माहिती होऊन, मृत्यूनंतर अधोगती न मिळता, जोपर्यंत जिवंत आहोत तोवरच आवश्यक त्या सुधारणा आचरणात करून मृत्यूनंतरचा
You can download the Garud Puran Marathi PDF using the link given below.
