HIS 220 Morden Indian History - Summary
आधुनिक भारताचा इतिहास या अभ्यासक्रमात नवभारताच्या निर्माणाची परंपरा आपल्याला समजावून घ्यायची आहे. या अभ्यासक्रमासाठी १८५७ ते १९५० हा कालखंड निवडला आहे. त्याची पूर्वसीमा १८५७ असून त्यावर्षी ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी पहिला स्वातंत्र्यलढा दिला. म्हणजेच ब्रिटिश वसाहतवादाला विरोध करून भारतीय अस्मितेसाठी पहिली राजकीय लढाई १८५७ साली सुरू झाली. म्हणून या अभ्यासाची ती पूर्वसीमा ठरविण्यात आली आहे.
१९४७ साली आपण स्वातंत्र्य मिळविले आणि १९५० साली आपले भारतीय प्रजासत्ताक प्रत्यक्षात अस्तित्वात आले. भारतीय राज्यघटना तयार झाली व त्यानंतर त्या घटनेनुरूप भारतीय प्रजासत्ताकाचा कारभार सुरू झाला. म्हणून १९५० ही या कालखंडाची उत्तरसीमा ठरविण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि त्यातून निर्माण झालेला भारताचा स्वातंत्र्यलढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्धचा लढा नव्हता. साम्राज्यवादी प्रवृत्ती व प्रेरणांविरुद्धचा तो एक व्यापक संघर्ष होता. आर्थिक व सांस्कृतिक शोषणाच्या साम्राज्यवादी धोरणांविरुद्ध भारतीय जनता उभी राहिली. सुमारे शतकभराच्या वैशिष्ट्यपूर्ण संघर्षानंतर भारताने आपले राजकीय स्वातंत्र्य मिळवले.या कालखंडात जे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक बदल कळत-नकळत घडत गेले त्यांतून आजच्या भारताची उभारणी झाली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे सर्वसमावेशक स्वरूप लक्षात घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, या स्वातंत्र्यसंग्रामातून केवळ राजकीय मूल्यांचा उदय झाला असे नव्हे; तर नव्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक व शास्त्रीय मूल्यांचा परिपोष होत गेला. प्रस्तुत अभ्यासक्रमात या सर्व प्रक्रिया अभ्यासणे अभिप्रेत आहे.
१. ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत :-
विशेषतः आपला ब्रिटिशांपुढे पराभव का झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने व्यापारासाठी आलेले ब्रिटिश राज्यकर्ते कसे बनले ह्याचा पूर्व इतिहास आपण लक्षात घेणार आहोत. ब्रिटिशांनी भारताचे आर्थिक शोषण कसे केले, पारतंत्र्यात एत्तद्देशियांना कसे अडकविले, येथील ग्रामव्यवस्थेचा हास कसा झाला याचे तपशील आपण पालणार आहोत.
परंतु त्याचबरोबर ब्रिटिश आमदानीतील शेतीचे व्यापारीकरण कसे झाले, भारतात सरंजामदारी अर्थव्यवस्था मागे पडून भांडवलशाली अर्थव्यवस्थेकडे वाटचाल कशी सुरू झाली या स्थित्यंतराचीही मीमांसा करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर कष्टकऱ्यांचा किंवा कामगारांचा एक नवा वर्ग आपल्या देशात निर्माण झाला. ह्या संघटित कामगारांनी आपल्या अस्मितेसाठी व हक्कांसाठी कोणत्या चळवळी केल्या व त्यातून भारतीय कामगार चळवळीचा आकृतिबंध कसा तयार झाला.
भारतीयांमध्ये स्वदेशी जाणिवा कशा रुजल्या, भारतीय राष्ट्रवादाचा उदय कसा झाला, समाजसुधारकांनी एतद्देशियांमध्ये वैचारिक जागृती कशी घडवून आणली, आर्थिक, सामाजिक वा राजकीय सुधारणांचे कोणते प्रवाह निर्माण झाले.
२. राष्ट्रीय चळवळ (१८८५-१९२०) :-
या पुस्तकात प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास अभ्यासावयाचा आहे. त्यात जहाल व नेमस्थ पंथ, मुस्लिम लीग, महात्मा गांधी यांचे कायदेभंग, सत्याग्रह व असहकार आंदोलने, क्रांतिकारकांचे सशत्र उठाव यांचे स्वरूप व परिणाम यांचा अभ्यास करावयाचा आहे. ब्रिटिशांनी प्रारंभी प्रांतिक स्वायत्तता देऊन व नंतर भारत-पाक फाळणी करून स्वातंत्र्य कसे दिले याचे तपशीलही आपण अभ्यासणार आहोत.
३. ब्रिटिश प्रशासनाचा इतिहास आणि घटनात्मक विकास (१८५८-१९५०) :-
या पुस्तकात प्रामुख्याने नवभारताच्या निर्माणात कायद्याचा व घटनात्मक चौकट निर्मितीचा प्रयत्न कसकसा होत गेला याचा आढावा घेणार आहोत. ब्रिटिश प्रशासनाची चौकट ही लष्करी प्रशासनाबरोबरच न्यायालयीन व केंद्रीय आणि प्रांतिक नागरी प्रशासनाची विशिष्ट पद्धती यांतूनच आजच्या भारतीय प्रशासनाची प्रणाली उत्क्रांत झाली आहे. ब्रिटिश आमदानीत निरनिराळ्या सुधारणा व घटनात्मक हक्कांबावत कायदे झाले.
पुस्तक १ : ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत
घटक १ : ब्रिटिश साम्राज्यवादाची पार्श्वभूमी
घटक २ : ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरण
घटक ३ : भारताचा औद्योगिक हास
घटक ४ : शेतीचे व्यापारीकरण
घटक ५ : ग्रामव्यवस्थेचा ऱ्हास व नागरीकरण
घटक ६ : भारतीय भांडवलदारीचा उदय
घटक ७ : शेतकरी कामगारांच्या चळवळी
घटक ८ : वैचारिक जागृती
घटक ९ : आर्थिक राष्ट्रवादाचा उदय
घटक १० : समाजसुधारणा व राष्ट्रवाद
घटक ११ : राष्ट्रवादी संस्था
घटक १२ : भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना